साकीनाका बलात्कार प्रकरणावरून मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आता सामना वृत्तपत्रातील मथळ्यावरून अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे. परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवावी लागेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यावरून 'आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर आधी कारवाई करा' असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.