१३ वर्षांपासून रखडलेला पत्राचाळ पुनर्विकास प्रश्न अखेरीस मार्गी

  • 3 years ago
२००८ सालापासून मुंबईच्या गोरेगाव परिसरात असलेला सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प तब्बल १३ वर्षांनी मार्गी लागला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे आता पत्राचाळीतल्या एकूण ६७२ मूळ रहिवाशांना पुढच्या दोन वर्षांत घरं मिळणार आहेत.


#patrachal #mhada #UdhhavThackeray #JitendraAwhad #goregaon