राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाला सुरुवात; हंगामातील पिकांना धोका

  • 2 years ago
भारतीय हवामान विभागाकडून अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पाऊस कोसळला. औरंगाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्‍यातील आज पाऊस कोसळला. या पावसामुळे हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पीक काढणीवर आली असताना शेतकऱ्यांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहणार आहे.

Recommended