सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर नेपोटिझमचा मुद्दा फिल्म इंडस्ट्रीमध्ये चर्चिला गेला....अनेकांनी यावर आपली ठाम मत मांडली. अगदी कंगना रानौतपासून करिना कपूर खानपर्यंत अनेक जण यावर व्यक्त झाली. मात्र मराठी सिनेसृष्टीतील अनेकांनी यावर मौनच बाळगणं पसंत केलं होतं. मात्र पहिल्यांदाच नेपोटिझमवर मराठी सिनेसृष्टीतील स्टार अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी आपलं ठाम मत मांडलंय... सुप्रिया पिळगांवकर एका पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, “ त्यांना काम मिळतं कारण ते कुणालातरी ओळखतात. ते खरच भाग्यवान असतात. मला असं वाटतं की त्यांनी या गोष्टीचा फायदा घेत त्यातून काहीतरी चांगलं घडवून आणलं पाहिजे. ही त्यांची चूक नसते की, ते अशा परिवारात वाढतात आणि जन्माला येतात. त्यांना या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. माझ्याही मुलीला बराच स्ट्रगल करावा लागला आहे आणि ती अजूनही स्ट्रगल करत आहे. तिला याविषयी काहीच हरकत नाही. याशिवाय मला असं वाटतं की मिळणारं काम कसही मिळतंच आणि न मिळणार काम काही करून हातातून कसही निसटून जातं. हे सगळं नशीबावर अवलंबून आहे.”