Kolhapur : मुश्रीफ म्हणतात मोर्चे काढू नका, मग काय भजन करायचं का?

  • 3 years ago
Kolhapur : मुश्रीफ म्हणतात मोर्चे काढू नका, मग काय भजन करायचं का?

Kolhapur : जिल्ह्यातील 2019 च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाला दसरा चौकातून सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात येईल त्यानंतर येते सभा घेतली जाणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणतात मोर्चे काढू नका, मग काय भजन करायचं का? शेतकरी नुकसान भरपाईसाठी तडफडत असताना सरकार मात्र काहीही गरज नाही अश्या भूमीकेत आहे. टीकाही शेट्टी यांनी दिली.

बातमीदार - सुनील पाटील
व्हिडीओ - मोहन मेस्त्री

#RajuShetty #HasanMushrif #kolhapur

Recommended