औरंगाबादेत महाराष्ट्र दिन ध्वजारोहण कार्यक्रमातच कचरा प्रश्नावरून भडका

  • 3 years ago
औरंगाबाद: शहरातील कचरा साफ झाल्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द आपण पाळल्याचे महापौर घोडेल सांगत आहेत. तर दुसरीकडे नागरिकांनी मात्र अजूनही जागोजागी कचऱ्याचे ढीग असल्याचे सांगत महापौरांच्या दाव्यातील हवा काढली.

महाराष्ट्र दिनी पोलीस आयुक्त कार्यलयातील ध्वजारोहण कार्यक्रमात नागरिकांनी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे यांनाच जाब विचारला. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुम्ही पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री देखील आहात, तेव्हा आमचे आरोग्य सांभाळा अशी मागणी उपस्थित महिला व नागरिकांनी केली.

Recommended