सच्चिदानंदोत्सवाच्या बद्दल माहिती व त्याचे महत्व (Importantce of Sacchinandotsav)

  • 7 years ago
सच्चिदानंदोत्सवाच्या बद्दल माहिती आणि त्याचे महत्व (Importantce of #Sacchinandotsav)

॥श्री प्रेमस्वरुपा तव शरणम्‌ पुरुषार्थरुपा तव शरणम्‌ शरणागतत्रितापहरा सच्चिदानंदा तव शरणम्‌॥

दरवर्षी #मार्गशिर्ष महिन्यातल्या शुक्लपक्षाच्या दुसर्‍या शनिवारपासून #श्रध्दावान आपापल्या घरी सद्‌गुरु श्री अनिरुध्दांच्या पादुकांचे #पूजन करुन #सच्चिदानंदोत्सव साजरा करतात. दिड दिवस किंवा दोन दिवस किंवा पाच दिवस पर्यंत सच्चिदानंदोत्सव साजरा केला जातो.
॥श्री प्रेमस्वरुपा तव शरणम्‌ पुरुषार्थरुपा तव शरणम्‌ शरणागत त्रितापहरा सच्चिदानंदा तव शरणम्‌॥

#आन्हिकमधील #अचिन्त्यदानी स्तोत्राचे हे नववे कडवे आम्ही नियमितपणे म्हणतो. मानवाच्या जिवनातून #आनंद हिरावून घेणारे, आणि त्याला गांजणारे त्रिताप म्हणजेच #अध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक ताप. सच्चिदानंदस्वरुप सदगुरुतत्वच या त्रिविध तापांपासून आम्हाला मुक्त करुन आमचे #जीवन आनंदाने भरुन टाकते.

तो सच्चिदानंद त्याचे कार्य करण्यास #समर्थ आणि तत्परच आहे. पण त्याचे कार्य आमच्या जीवनात होण्यासाठी आम्हालाच त्याच्यावर #प्रेम करायला हवे. त्याच्या ऋणांचे स्मरण करुन #कृतज्ञ रहायला हवे व सदगुरुंच्या चरणी संपूर्णपणे #शारण्यभाव स्विकारायला हवा.

आमच्या जीवनात #प्रेमभाव अंबज्ञताभाव आणि शारण्यभाव हे तीन #भाव जेवढे अधिक वाढतील तेवढ्या प्रमाणात आमचा प्रपंच-परमार्थ #आनन्दमय होईल आणि ह्यासाठीच #श्रध्दावान मार्गशीर्ष महिन्यात ‘सच्चिदानंदोत्सव’ साजरा करतात.

स्वत: भगवान श्रीकृष्णाने श्रीमदभगवद्‌गीतेत " मासांनाम मार्गशिर्षोहम"(महिन्यांमधे मी मार्गशिर्ष महिना आहे.) असे म्हटले आहे. मार्गशिर्ष ह #देवयान-मार्गाच्या अंतिम ध्येयापर्यंत प्रवास करु इच्छिणार्‍या श्रध्दावानांसाठी अत्यंत महत्वाचा पर्वकाळ मानला जातो. या मार्गावरुन सच्चिदानन्दाकडे जाण्याचा #प्रेम प्रवास सुकर व्हावा यासाठी श्रध्दावान मार्गशिर्ष महिन्यात सच्चिदानंदोत्सव साजरा करतात.

या मार्गावरील प्रवासात आमचा प्रपंच व #परमार्थ सुखाचा होण्यासाठी #मन #प्राण आणि #प्रज्ञा या तिन्ही स्तरांवर उचितत्व कायम राहणे महत्वाचे आहे. सच्चिदानंदोत्सवात श्रध्दावान अनिरुध्द-अथर्वस्तोत्र आणि अनिरुध्द अष्टोत्तरशत-नामावलि यांसह, उचितत्व साध्य करण्याच्या हेतूने #सद्गुरु श्री‍अनिरुद्धांच्या पादुकांचे पूजन करतात

सच्चिदानंदोत्सव साजरा करणार्‍या श्रध्दावानांचा भाव हाच असतो की या पूजनातील अथर्वस्तोत्र आमच्यातील चंचलतेचा नाश करु दे आणि अष्टोत्तरशत नामावली आमच्या देहातील १०८ शक्तीकेन्द्रांना सामर्थ्य पुरवु दे.

सच्चिदानंदोत्सव साजरा करणारे श्रध्दावान सदगुरुंकडे आशिर्वाद मागतात की -
१) आमच्या तीनही स्तरांवरील अशुध्दी, अपवित्रता, अनुचितता दूर व्हावी.
२) आमच्यात #प्रेमभाव, अंबज्ञताभाव, आणि शारण्यभाव वाढत रहावा.
३) आमच्या मन प्राण आणि प्रज्ञा या तीन स्तरांना त्रस्त करणार्‍या चंचलता अवरोध दिशाहिनत्व या तीन असूरांचा नाश होऊन, तीनही स्तरांमधे उचितता रहावी.

वामपादेन अचलम दक्षिणेन गतिकारकम्‌
म्हणजेच वामपादाने अनुचिताला रोखणारे आणि दक्षिणपादाने उचिताला गति देणारे असे ज्यांच्या चरणन्यासाचे वर्णन केले गेले आहे अश्या सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या पादुकांचे पूजन करुन सदगुरुकृपेने प्रपंच-परमार्थ एकाच वेळेस आनन्दाचा व्हावा, याच श्रध्देने श्रध्दावान सच्चिदानंदोत्सव साजरा करतात.



--------------------------------------------------------------------------------------------------
Samirsinh Dattopadhye b

Recommended